शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

नात

नात्यातली दरी जी दोघांना इतक लांब करते की ऐलतीरावरच पैलतीरावर ऐकूही येत नाही, नात तुटत तेव्हा तो तुटलेला धागा एखाद्या नको असलेल्या अवयव सारखा आयुष्यभर वागवावा लागतो ...समोरून नकार येण ही गोष्ट विसरली जाऊही शकते पण जुळून आलेल नात ज्याने एकेकाळी वसंत अनुभवला आहे त्या नात्याचं नाकारलं जाणं, ही गोष्ट आयुष्यभर धमन्यातून रक्ता सारखी फिरत राहते ...बाहेर पडून जमाना होतो त्याला पण जखमेनंतरच्या व्रणासारखी त्वचेलगत तीच अस्तित्व असतच ......आणि विस्मरणाच वरदान या असल्या नाकारलेल्या आणि इगोवर घाव झालेल्या नात्यांच्या बाबतीत कधीही काम करत नाही त्यांना आठवणीचा शाप असतो ...त्या ही अणुकुचीदार आठवणी ज्यांच्यात व्रणामधूनही जखम हिरवी करण्याची ताकद असते ....असे अनेक अश्वथामा असल्या आणि असल्या कित्येक जखमा घेऊन अवती भवती वावरत असतील याची कल्पनाच ना केलेली बरी .....त्यातले काही आयुष्य संपवतात आणि नव्या जखमांसाठी नव शरीर धारण करतात कदाचित....पण माझा तर आत्महत्येवर विश्वास नाही कारण जिथे मन आत्मा सगळ वाहूनही ज्यात दुरावा येतो तो निव्वळ ती ती व्यक्ती ते नात सांभाळायला आणि निभावायला मानसिक रित्या कमकुवत असते म्हणून किंवा सगळ्या परीघ पलीकडे जाऊन ते प्रेम स्वीकारायला त्या व्यक्तीचा ठाम पणा कमी पाडतो म्हणून तिथेच मनाने प्राण सोडलेला असतो आणि ज्या शरीरात मनच नसते त्याला वेगळ्या आत्महत्येची काय गरज ????

अनुजा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा